Monday, January 1, 2018

रामटेक, नागपूर

ज्ञानतपस्वी अगस्तीजी इथं राजकन्येशी लग्न करून आश्रमात तपश्चर्या करत होते.
प्रभू रामचंद्र वनवासात त्यांची भेट घ्यायला इथं आले. सहकुटुंब बरेच दिवस राहीले. रावणजींचा वध करायची प्रतिज्ञा त्यांनी इथेच केली, आणि इथून पुढे नाशिकला गेले.
बौद्ध धर्मीय ज्ञानतपस्वी नागार्जून स्वामी यांनी इथं कित्येक वर्षे तपश्चर्या केली.
महानुभव पंथाचे आद्यआचार्य चक्रधर स्वामी यांनीही पंथोपदेश करण्यासाठी काही काळ (१० महिने) इथं वास्तव्य केले.
कालिदास गावाच्या एका अनाडी मानसानं श्रीराम प्रभूंच्या कृपेेने इथेच मेघदूत नावाचे विश्वप्रसिद्ध, जगद्मान्य संस्कृत महाकाव्य लिहीले.
नागपूरकर भोसले महाराजांनी इथल्याच अंबाला तलावात आंघोळ करून केलेल्या प्रतिज्ञेनुसार मंदिरांच्या संरक्षणार्थ इथं किल्ला उभारला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी इथं १२ वर्षे तपश्चर्या केली.
विष्णूजींनी इथेच नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूजींचा टेटवा फाडून डेंडाळा बाहेर काढला, वध केला.
वाकाटक साम्राज्य इथूनच चारिदिशा वाढलं फोफावलं...
बाकी सटर फटर तं न बोललेलंच बरं ना भाऊ... इथं सगळं थोर आहे !







No comments:

Post a Comment

सिग्नलवरील गिधाड, सावज आणि मी

काल संध्याकाळचा धरमपेठच्या सेंट्रल मॉलसमोरच्या चौकातला किस्सा. मी वनामतीकडून दिक्षाभुमिकडे चाललेलो. कारमध्ये होतो. सिग्नल लागलेला. गा...