शतकं उलटली तिची पावलं तिथं उमटून... अजूनही ती जागा, लखोजीराव जाधवांचा तो वाडा, ते गाव, तो परिसर तिच्या अस्तित्वानं भारलेलं आहे. तिची पावलं स्वातंत्र्याची पावलं ठरली. ती चालत गेली विदर्भापासून कोकणापर्यंत आणि ही अवघी भूमी गोतावळ्यासह पिढ्यानपिढ्यांच्या दास्यातून मुक्त झाली.
तिनं एक शिवाजी घडवला, घराघरात शिवाजी घडला. महाराष्ट्र देश उभा राहीला. ती स्वराज्याचं खत, पाणी झाली. दोन छत्रपती, लोककल्याणकारी सम्राट तिने एकहाती घडवले. तिच्या एका समर्पित आयुष्यानं अगणित आयुष्य सार्थकी लागली. खरीखुरी स्वातंत्र्यदेवता, राजमाता जिजाऊंची पायधुळ कपाळी लागली आणि सार्थक झालं.




No comments:
Post a Comment