29 जुलै 2017
कारंजा (लाड). स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी इथल्या नवाबाला, या गावाला दोन वेळा लुटलेलं. कधी हिंदु, कधी मुस्लिम तर कधी जैन धर्मीयांच्या धर्मसशक्तीकरणाचे केंद्रबिंदु राहीलेले चार वेशींचे तीन तलावांमध्ये वसलेले वाशिम जिल्ह्यातील टुमदार गाव. कारंजा काळविट अभयारण्य त्याच्या लौकिकात आणखी भर घालतंय.
बराच फिरलो उभा आडवा, पण काळविट काही दिसलं नाही... आता सगळीकडंच गवत वाढलंय त्यामुळं त्याला १० वाटा मोकळ्या, आणि त्यातूनही ते काही देव नाही, भाविकांसाठी एका जागी बसून रहायला. रूषी तलाव मस्त आहे. आणि त्याच्या काठावरचं मंदीरही. एरवी म्हटलो असतो... जास्त लाडात यायचं काम नाही. पण आता लाडात (कारंजा) यायला हरकत नाही... 


No comments:
Post a Comment